प्रत्येकाला एक तरी वाईट सवय असते, मला पण आहे,, मनात जे काहि येइल ते शब्दात विणण्याची.. त्यातुनच अश्या कुणाला न आवडणा-या, कुणाला आवडणा-या, कविता तयार होतात........
प्रस्तुत सर्व कविता १००% काल्पनिक आहेत..वाचणा-याशी संबंध आढळल्यास तो एक वाईट योगायोग समजावा, आणि जर दोष द्यायचा असल्यास फक्त मलाच द्यावा. कळावे, लोभ असावा.......
आपलाच "निलेश"
__________________________________________________________
लहानपणी ऐकलेली आणि मनात कयमची रूजलेली गोष्ट......त्यावरुनच हि कविता तैयार करु शकलो... हा एक प्रयत्न आहे वाट चुकलेल्या मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी, देवाला विसरा, पण आई-वडिलांना विसरण्यासारखे घोर पाप नाही हे लक्षात ठेवायला हवे........
एक होता बाप
त्याला नेहमी त्यांची चीड यायची
पाहिल्यावर त्यांना तिरस्कार जागायाचा
आईशी नेहमी प्रेमाने बोलणारा
बापाशी तिरस्काराने वागायचा II
तिरस्काराचे कारण हि ठोस होते त्याच्याकडे
मग बापावर त्याचे प्रेम कसे जडणार
आई वर त्याचे प्रेम होते
पण एक आंधळा बाप कसा आवडणार II
आईच्या हाकेवर लगेच जवळ येणारा तो
बापाच्या हाकेने दूर पळायचा
ह्या बापाला दूर ठेऊ शकत नाही
हा त्रास नेहमी त्याला छळायचा II
शाळेत हि मित्र दूर पळायचे
एका आंधळ्याचा पोर म्हणून चिडवायचे
असेच दिवस तो पसार करायचा
बाप कधी सोडून जाईल ह्याचीच वाट पहायचा II
सकाळी एकदा तो उठला झोपेतून जेव्हा
बाप त्याच्याच बाजूला झोपला होता
त्याची आई ठार ठार रडत होती जेव्हा
तो एकटाच मनामध्ये हसत होता तेव्हा II
जो त्याला ह्या घरात नको होता
तो आता कायमचा निघून गेला आहे
आनंद त्याच्या कवेत मावत नव्हता
जाणारा तो किती सुख देऊन गेला आहे II
ह्याच आनंदात विचारल त्याने आईला
बाप आंधळा असण्याचे कारण सांग ना मला
आई मात्र त्याला पाहून स्तब्ध झाली होती
बाळा त्याचे कारण कसे समजावू तुला II
तरी हि त्याची जिद्द
कारण ऐकण्याची
जाणीवच नव्हती त्याला
बाप नसण्याची II
आइने हि ठरवले
त्याला सगळ काहि सांगायच
पतिला दिलेले वचन तोडुन,
आता काहिच नाही लपवायच II
लहानपणी एका अपघातात जेव्हा
तुझे दोन्हि डोळे तु गमाविले होते
तुझ्या उज्ज्वल प्रकाशापायी
तुझ्या बापाने स्व:तचे भविष्य अंधारिले होते II
ऐकुन हे जीवघेण सत्य
जणु तो बधीरच झाला होता
जोरजोराने हसणारा तो
आता अस्थिर झाला होता II
तिरस्कार होता बापासाठि ज्या डोळ्यात
त्याच डोळ्यात आता अषृंचा पूर आला होता
जेव्हा त्याला बापाची आठवण येत होती,
तेव्हाच तो नेमका त्यच्यापासुन दुर गेला होता II
-निलेश (१५.८.१०)
एक होती आई
तो एक वेडा प्रेमी होता
प्रेमात सर्व काही विसरला होता
अगदी स्वत:चे अस्तित्व, स्वत:ची ओळख
तो गमावून बसला होता
ती होती सुंदर अगदी नक्षत्रासारखी
पण स्वभावाने होती भलतीच स्वार्थी
त्यांच्या एका भेटीत त्याने तिला सर्वस्व दिले
तिने देखील त्याच्याकडून एक वचन घेतले
तिने ठेविली एक अट
अलगदपणे रचिला एक कट
तिने त्याला प्रेम भरपूर दिले
प्रेमाच्या मोबदल्यात आईचे काळीज मागितले
तोही वेडा तिच्या प्रेमाने भारावून गेला
आईचे आईपण, मातृत्व सर्व काही विसरून गेला
तो गेला स्वत:च्या घरी
वाट पाहत होती माउली दारी
तो संपूर्ण तैयारी सह आला होता
जणू यमच त्याच्या अंगात संचारला होता
लपविलेला सुरा त्याच्या हाती आला
आणि त्या माउलीचा घात झाला
काळीज हातात घेऊन जाताना
त्याला काहीच वाटत नव्हते
कारण आता त्याला फक्त
तिचे घर दिसत होते
तो चालत असताना धडपडला,
काळीज निसटले हातातून
बाळ तुला लागले नाही ना
हाच आवाज आला काळीजातुन
- निलेश
---------------------------------
एक न सुरु झालेली प्रेमकहाणी
त्याला ती खुप आवडायची
नेहमीच त्याला घाई तिला भेटायला जायची
ति असताना तिलाच बघण
ति नसताना तिच्या आठवणीत हरवण
तो तिला जीवापाड प्रेम करायचा
पण तिला सांगायला नेहमी घाबरायचा
ती हि रोज त्याला भेटायची
मनातल्या गुज गोष्टि त्याला सांगायची
तिला काय आवडत, तो आवर्जुन लक्षात ठेवायचा
तिला आवडत म्हणुन रोज एक गुलाब आणायचा
आज तिला विचारणार, तो नेहमी ठरवायचा
रोज मनाच्या पाटिवर हाच धडा गिरवायचा
एक दिवस ठरवले त्याने आज फैसला करायचा
आज मनातील भावनांना मार्ग मोकळा करायचा
तो गेला नेहमीच्या ठिकाणी भेटायला
हजारो गुलांबाचा गुच्छ त्याच्या साथीला
आज कशी नाहि आलि, एवढा वेळ झाला तरि
हुरहुर लागली त्याच्या जीवाला कितीतरी
मनात विचाऱांचा काहुर माझला
जणु त्याच्यासाठि काळच थांबला
ती बसायची नेहमी जिथे त्याच्याशी बोलताना
सहज लक्ष गेले तिथे, तिला आठवताना
होती एक चिठ्ठि वजा कागद तिथे
नाव त्याचे होते चिठ्ठिवर, तो गेला तिथे
वाचताना चिठ्ठी, अश्रुंनी कागद हि भिजला
नव्हती आता ती ह्या जगात,जिच्यासाठि तो एवढा झिझला
" मला तु आवडतोस हे तुला कधी कळणार नाहि"
प्रीत माझ्या मनाचि तुज्या मनी कधीच रूळणार नाहि
वाचुन तो मजकूर, त्याच्या भावनांनाहि पुर आला
ती आता ह्या जगात नाहि,काळ हा कसा कृर आला
अजुन हि तो तिथेच तिच्या आठवणीत वावरतो
ती पुन्हा इथेच येणार आहे, मला सांगतो
-- निलेश (१८.७.२०१०)
-------------------------------
त्याची आठवण
तिला तो अजुनहि आठवतो
तिच्या श्वासात तो घुटमळतो
त्याच्या आठवणीतील श्रावण
अजुनहि तिच्या मनाला भिजवतो II
आज तो तिला भेटणार आहे
ति कावरि बावरि त्याला भेटण्यासाठि
तो तिची सोबत करणार आहे आयुश्यभर
आयुश्य वेचिले तिने ज्याच्यासाठि II
चाहूल लागलि अलगद कुणाची तरि
डोळ्यात भरुन आलि अशृंची एक सरि
स्पर्षाने त्याच्या ति हि शहारलि
अशृंनाहि गोडवा आता अमृता परि II
मिठित जेव्हा ओढिले त्याने
स्वर्गहि त्या समोर फिका जाणवे
चुंबिले नयनासी तिच्या जेव्हा
हळुवार गारव्याचा स्पर्ष जाणवे II
का होतास दुर माझ्यापासुनि
काहिच नाहि का तुला वाटले
येउनि कुशीत त्याच्या, विचारले तिने
अन पुन्हा डोळ्यात अशृंचे घन दाटले II
डोळे अजुन हि घट्ट मिटलेले
पापण्यांचा थरकाप, डोळे पाणावलेले
हात सुटला नकळत तिच्या हातातुन
पुन्हा तिचे स्वप्नबंध तिच्यापासुन दुरावलेले II
तो पुन्हा येणार आहे तिच्यासाठी
आभास हा तिला नेहमी छळतो
तिला तो अजुनहि आठवतो
तिच्या श्वासात तो घुटमळतो II
--निलेश (२५.७.१०)
-----------------------------------------------
वसुधा
आठवीचा वर्ग, गणिताचा तास
बाइंचे ओरडणे, ओरड्ण्याचा त्रास
पहिल्या बाकावर 'वसुधा करमरकर'
मागच्या बाकावर आमचा नंबर
वसुधेचे लक्ष बाइंकडे
आमचे लक्ष वसुधेकडे
वसुधेचा पहेराव अगदि सरळ
म्हणुनच कि काय आमच्यावर त्याची भुरळ
वसुधा आम्हाला सर्वांना आवडायची
तिच्यासाठि आप-आपसात भांडण व्हायची
फक्त एक मुलगा आमच्यात नसायचा
वसुधेपासुन दुर पळायचा
नाव त्याचे 'वसंत क्षीरसागर'
अभ्यासात नेहमी पहिला नंबर
एकदा विचारले वसुधेला मी माझ्याबद्दल
ती म्हणाली, पुन्हा विचारलेस तर घडवील अद्दल..
एवढे बोलुन हि पुन्हा ती हसली
मला जवळ बोलावुन माझ्या बाजुला बसलि
तिचे हे वागणे बघुन मी खल्लास झालो
हि आमची शाळा आहे, चक्क विसरून गेलो
तिने जवळ येउन सांगितले माझ्या कानात
उद्या भेटशील का मला आमराइच्या वनात
मी गेलो तिला भेटायला आमराइच्या वनात
म्हटलं बघु तरि, काय आहे तिच्या मनात
वसुधा आलि आणि सरळ विचारले मला
माझ्याबद्दल सांगशील का वसंताला?
तिच्या ह्या बोलण्याने मी गार झालो
तिच्या अनपेक्षित वाराने मी ठार झालो
-------------------------------------------------------------
तुला नाहि कळणार
का नदी धाव घेते समुदाकडे
तुला नाहि कळणार
का चातकाचे लक्ष पावसाकडे
तुला नाहि कळणार
का दु:ख नाहि रेशीमकिड्यला मरणाचे
तुला नाहि कळणार
का भ्रमराला आकर्षण फुलाचे
तुला नाहि कळणार
का कृष्णभेटीस राधा चिंतातुर
तुला नाहि कळणार
का विष हि पिण्यास मीरा आतुर
तुला नाहि कळणार
का चंद्राला ओढ पौर्णिमेची
तुला नाहि कळणार
का मनाला ओढ तुझ्या मिलनाची
तुला नाहि कळणार
__________________________________
तो आणि ती
तो होता रसिक,
नेहमी कविता करायचा
ती भलतीच अरसिक
कवितेचा तिला कंटाळा यायचा
तो तिला म्हणाला एकदा
चंद्र आणुन देइन तुला
सोबत सर्व तारकांच्या
आकाशात नेइन तुला
ती म्हणालि नको ते तारे
चंद्राची गरज नाहि मला
वरून खालि पडलास तर
किती लागेल तुला
तो म्हणाला स्वप्नात जाऊ
सप्तरंगात न्हाऊ
ती म्हणालि कशाला ऊगाच
झोपायला घरीच जाऊ
तो म्हणाला आकाशात जाऊ
आकाशाचे त्याला भलतेच आकर्षण
ती खरच खुप घाबारली
तिने त्याला समजाविले गुरुत्वाकर्षण
______________________________________
"भेट देवाची"
एकदा मला देव भेटले
अहो, खरच मला देव भेटले
त्यांनी विचारले मला
काय हव आहे तुला?
तुझी काहि इच्छा आकांक्षा एखादि महत्वकांक्षा
गुप्तधन सर्वज्ञान, सर्वभाषा
कि हवी आहे तुला "बिपाशा"
मी म्हणालो आवर्जुन देवाला
अहो! हे सर्व मला कशाला मला
माझा मार्ग मोकळा करा
तुम्हाला हा उपद्व्याप कशाला?
मी आहे सामान्य माणुस, सर्व सामान्य माणुस
अल्पसंतोषी, सर्व दशेत सुखी
ह्यावर देव हि हसला,
म्हणाला सामन्य माणुस असतो का कधी सुखी
हिच खरि वेळ आहे वर मागण्याची
तुझ्या मनातील इच्छा सांगण्याची
पुन्हा त्याची जिद्द मला सुखी करण्याची
माझी ओंझळ सुखाने भरण्याची
मी त्याला म्हणालो दे मला वर
नंतर लगेच गाठतो माझे घर
दे मला वर काहि तास झोपण्याचा
काहि तास का होइना हे जग विसरण्याचा
____________________________________________
प्रेम
प्रेम असाव नदी सारख
नेहमी खळ्खळ्णार, एकधारेन वाहणार
प्रेम असाव फुलासारख
बहुरंगी, सुगंधी व प्रसन्नता देणार
प्रेम असाव एखाद्या बाळासारख
निष्पाप, सुंदर, सर्वांना मोहुन सोडणार
प्रेम असाव धुंद मध्यासारख
डोक्यात झिणझिणार, कुणाचि हि पर्वा न करणार
प्रेम असाव काचेसारख
स्वच्छ, स्पष्ट प्रतिबिंब दाखविणार
प्रेम असाव आठवणीसारख
नेहमी लक्षात राहणार, कधी हि न विसरता येणार
_____________________________________________
तुझी आठवण
रात्र जागविणारि, स्वप्ने दाखविणारी
तुझी आठवण
अश्रु सजविणारी जखम रूजवीणारि
तुझी आठवण
हृदय चिरणारी, घायाळ करणारी
तुझी आठवण
प्रेमाने भरणारी, बुडताना तारणारी
तुझी आठवण
मनाला हेलावणारी, मला जळविणारी
तुझी आठवण
दिनरात्र सतविणारी, मला भुलविणारी
तुझी आठवण
नाते जपणारी, कधी हि न सरणारी
तुझी आठवण
_____________________________________
फक्त तुझीच आठवण येते
चिंब पावसात मी भिजतो जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते
रिमझिम सरी रडवते जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते II
गुलाबाच्या पाकळ्या फुलतात जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते
कोमेजलेल्या कळ्या उदासतात जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते II
पहाटेच्या साखरझोपेत दिसतं कोणी जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते
अंधारात रात्रीच्या हरवत कोणी जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते II
एखादी झुळूक मन सुखावून जाते जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते
विरहाची जखम सलते मनाला जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते II
कोणी तरी येण्याचा भास होतो जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते
कोणी नसण्याचा त्रास छळतो जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते II
कोणाच्या तरी हसण्याने काळीज ठार होते जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते
अश्रुंचा होतो पापण्यांना भार जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते II
तो चंद्र चांदणीला कवेत घेतो जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते II
तू नाहीस आता माझी हे मनाला कळते जेव्हा
फक्त तुझीच आठवण येते II
-निलेश (५.०८.१०)
_________________________________________
पुन्हा तु येशील जेव्हा..........
आज पुन्हा तू येशील
आज पुन्हा मी नसेन
पण तू जाऊ नकोस
माझी वाट बघII
मी येईन पण उशिरा
तरी हि तू थांब जराII
मी आल्यावर तू रागावशील
रागावून का होईना माझी वाट पाहशीलII
वेळ नाही थांबणार तुज्यासाठी
तरी हि तू थांब माझ्यासाठीII
संपूर्ण संध्याकाळ आपण दोघेच असू
म्हणशील त्या विषयावर गप्पा मारत बसू II
तू म्हणशील उशीर होत आहे
वेळ हातातून निसटून जात आहेII
मला जाउ दे, येईन पुन्हा कधी तरी
असशील निवांत तू, येईल ती वेळ कधी तरीII
एवढे बोलून हि पुन्हा तू थांबशील
माझ्याच बाजूला येऊन बसशील
पदराशी करत अलगद चाळे
पायाला माझ्या पाय भिडवशीलII
जेव्हा मी येईन जवळ तुझ्या
हनुवटी माझी नकळत धरशील
ते वाट पाहतील, मला जावेच लागेल
अशी सबब हि पुढे करशीलII
ते म्हणजे कोण?
हे मी मुद्दामहून विचारेन
माझे पती.....
तू हि रागाने सांगशील.........................
-निलेश (१३.८.१०)
________________________________________________________
भेट-एक स्वप्न
आज तो येणार होता
कुशीत तिला घेणार होता
वाट पाहुनी अश्रु कोरडी झालि
आज तो अश्रु पुसणार होता II
आठवणींने गर्दि केली मनात तिच्या
त्याला पहाणे हिच तिची इच्छा
कधी येइल तो? कुठुन,कसा?
किती हळु जात आहे वेळ नेहमीपेक्षा II
आल्यावर तो, आपण नाहि बोलायच
न बोलताच बरच काहि सांगायच
पुरे झाले आता दुर रहाणे
पुन्हा असं दुर नाहि जायचं II
काहि दिवसांची अट होती
किती वर्ष दुर राहिलास
किती वाट तुझी पाहिली मी
का तु माझा अंत पाहिलास II
तुला बरेच काही विचारायचे आहे
मनात साठविलेले क्षण तुला ढ्यायचे आहे
पुन्हा नाहि सोडुन जाणार मला
तुझ्याकडुन हे वचन घ्यायचे आहे II
स्व:तशीच असे बोलणे तिचे सुरु होते
कधी येणार तो, केव्हापासुन त्याची वाट बघते
रागावणे नाहि जमणार मला त्याच्यावर
त्याच्याशी न भांडण्याचेच तर ठरविले होते II
अचानकच एक सावली दुर दिसली
तो आला म्हणुन ती स्वत:शीच हसली
पाठ फिरवुनी सावलिशी ती उभी राहिली
अश्रुंची जणु डोळ्यातुनि सरि वाहिली II
हळुच आवाज कोणाचा तरी कानी आला
तो नक्किच नाहि, भीतीने जीव शहारला
होता कोणी मित्र त्याचा, तिला भेटला
का नेमका त्या वेळि तिच्या काळिजाचा ठोका चुकला II
वाट पाहिली जीव ओतुनी डोळ्यात ज्याची
तो आता कधीच येणार नव्हता
डोळ्यात होती आस भेटण्याची ज्याला
तो आता ह्या जगातच नव्हता II
निलेश-(२८.१२.२०१०}
नाहि विसरता येत..
तुझे मनात येणे अन
क्षणात जाणे
नाहि विसरता येत....
तुझ्या आठवणीत हरवुन
पुन्हा एकटेच रहाणे,
नाहि विसरता येत....
अलगद तुझे मिठित येणे
नकळत असे तुझे हरवणे
नाहि विसरता येत....
बनावट तुझे ते रुसणे
उगाचच पाठ फिरवुन बसणे
नाहि विसरता येत....
तु असण्याचा आभास
तु नसण्याची हुरहुर
नाहि विसरता येत....
'ते दोघे'
आज "त्याच्या" हालचालित कमालीची स्थिरता होती..
घरातुन बाहेर पडण्याची बरिच घाई झाली होती..
कालपर्यंत "त्याच्या"साठी झटले जे..
त्यांची रवानगी आज वृध्धाश्रमाकडे होती.. II
तिच्या शब्दाच्या बाहेर नव्हता तो
मग त्यांना घरात कशी जागा रहाणार...
आठ्वणींचे जरि ओझे झाले असले तरि
त्यांच्या बरोबर आता फक्त आठवणीच रहाणार... II
पावलांनाहि ओढ सुटत नव्हती घराची,
मग मनाला काय समजिवणार..
मरणाचेहि आमंत्रण नाहि येत आहे...
दु:खांचे दगड काळिजावर ठेऊन कसे जगणार II
ख़ंत नव्हती त्याला काहिच पाप करण्याची
कसलि हि धडपड होती तिला सुखी करण्याची..
तिच्या एका शब्दावर त्यांना आयुष्यातुन उठविण्याची
पर्वाच नव्हती का त्याला त्यांच्या हृदयाची II
शब्दांनाहि अर्थ नव्हता उरला आता
ओल्या अशृनाहि किंमत नव्हती त्यांच्या..
उभे आयुष्य झिझवले ज्याच्यासाठी त्यांनी
त्यानेच खुपसला होता सुरा कळिजात त्यांच्या II
ओलांडला उंबरठा जेव्हा त्यांनी घर सोडताना
काळ हि जणु थांबला होता पाहुन त्यांना..
निष्ठुर कोणी असु शकतो इतका..
का अजुन हि विश्वास बसत नव्हता त्यांना II
...निलेश
"बायको "
त्याच्या सुखासाठि स्वत:चे दु:ख विसरते
ज्याच्यासाठि ती झटते दिवस रात्र..
क्षणाची हि उसंत न तिला विसाव्यासाठि
असेच चालत असते तिचे हे सत्र...
पहिल्या प्रहरि दिवस उजाडतो..
आठव्या प्रहरि हि झटत असते...
त्याच्या न्याहरि पासुन जेवणापर्यंत
तिचि अगदि कसुन तैयारि असते....
त्याला काय हव असेल-नसेल
नेहमी त्याच विचारात गुंतलेली...
माहेरचा ओलावा नसतो राहिलेला
सासरच्या सरबराईत रमलेली
कधी रुसते, क्षणात पाठ फिरवुन बसते
लहान मोठ्या आनंदात स्वत:ला सामावुन घेते...
नवराच असतो तिच्यासाठि जगण्याची दिशा
दु;खाच्या वेळेत सोबत वनवासात हि जाते...
कधी झालाच जर भांडण-तंटा दोघांत
तर अधुन मधुन माहेरची धमकि हि देते..
चुकुन जर गेलिच माहेरि काहि दिवसांच सांगुन
हमखास दोनच दिवसात परत येते...
अशीच असते थोडि रागीष्ट पण खुप प्रेमळ
कैवा-यांसाठि काळ, इतरवेळि सोज्वळ
नाहि कंटाळत कधी कामाला कोणत्या
न जाणो कुठुन आणते एवढे बळ
कुठल्याहि संकटात त्याच्यावर जीव ओवाळणारि
त्याच्यासाठि काहिहि करायची तैयारि असते
नव-यावर बेहद बेशर्थ प्रेम करणारि
खरच बायको हे एक अजब रसायन असते...
ज्याना नाहि कळलि महति बायकोची
काय केले मग त्यानी जगात येउन
घेउन बघा कधीतरि प्रेमाने मिठित तिला
होउन बेधुंद ..सर्व भान विसरुन
"प्रेम"
आज तिच्या आठवणीत तो
पुन्हा एकदा डोकावत आहे...
एकदा पुन्हा तिच्या श्वासात
त्याचा श्वास घुटमळत आहे..
कधी सोडुन गेला तेव्हा तो
तिचे तिलाच कळले नाहि.
वाट पाहुनि वेळ किती गेला
पुन्हा तिच्याकडे त्याची पावले कधीच वळलि नाहि...
दिसत नसतानाहि तिला काहिच
ती त्याचा स्पर्ष नेमका ओळखायची..
दुर असेल कीती हि तो जरि...
त्याच्या येण्याची चाहुल तिला लागायची...
आता सर्व काहि दिसते तिला
मग तोच का तिला दिसत नाहि..
हुरहुर मनाला का इतकि
का हे कोडे सुटत नाहि..
तो हि नेहमी तिच्यात गुंतलेला
सर्व जग विसरुन प्रेमात रंगलेला..
काहिच नव्हते जग त्याचे, तिच्याशिवाय
झोप न क्षणाची..तिच्याच स्वप्नात जागलेला..
तो नव्हता तिच्यासोबत जरि आता
मन त्याच्याच संगतीत रंगल होत..
क्षणापुर्वी रिकाम झालेल मन
त्याच्याच आठवणीने भरल होत...
जग सोडताना त्याने तिला
स्व:ताची नजर दिलि होती
अंधारलेल्या तिच्या निर्जन आयुष्याला
सुखाच्या फुलाची पालवी दिलि होती...
अजब हे सत्य तिलाच ठाउक नव्हते..
त्याच्या प्रेमाचे मोल नक्किच अनमोल होते..
"निलेश (10.11.14)
"राधा"
आज राधा होती एकटी
अगदि कान्हा सोबत असताना
छळत होता सहवास त्याचा
अगदि कोणी तिथे नसताना II
रागावली होती आज ती सख्यावर
कितीतरि दिवसानी आज तो भेटला होता
ज्या वेणुने वेड लाविले होते त्याचे
त्या वेणुच्या सुरात तिला तो सापडत नव्हता II
आज नाहि भेटायचे त्याला,
तिने ठरविले होते...
आज माघार नाहि घ्यायची,
हेच धडे मनाच्या पाटिवर गिरविले होते II
राग हि फसवा होता तिचा
हे त्याला भेटल्यावर कळले..
मनाने हि माघार घेतलि तिच्या
पुन्हा तिचे पाय त्याच्याकडे नकळत वळले II
तुच तर माझी सखी, तुझाच मी ..
कानात सांगितले कान्हाने जेव्हा..
अलगद खळि खुललि गालावर तिच्या .
घेतले ओढुन मिठि त्याने जेव्हा II
'राधा' कसे समजावु तुला
माझे प्रेम तुझ्यावरचे..
किती अनमोल आहेत मला
हे ओघळणारे अशृ गालावरचे...II
माझ्या प्रत्येक श्वासावर हक्क तुझा
तुझ्याचसाठि माझे हे जगणे आहे....
निरर्थक असेल तुझ्याशिवाय हे जग
आठवणीत हि तुलाच बघणे आहे...II
नको दुरावु पुन्हा तुझ्यापासुनि
अबोल तुझा हा चेहरा छळतो मला ..
राग तुझा तसा फसवा आहे
गोड तुझा हा राग कळतो मला...II
(निलेश-6.12.14)